पाऊस असा आला की.. मन राहिले न था-याला..
रिमझिमत्या आठवणींची लागली ओढ वा-याला...
पाऊस असा आला की.. तळमळतो दिवस कधीचा..
हे गाव बुडाल्यापासून हा सुटतो धीर नदीचा...
पाऊस असा आला की.. कळ गर्भाची वनवासी..
पाण्यात वांझ खडकाच्या बाळुते धुतो संन्यासी...
पाऊस असा आला की.. सार्थकात भिजले व्यर्थ..
भांगेच्या देहावरही आभाळ घालते तीर्थ...
पाऊस असा आला की.. घर डोळ्यांसंगे गळते..
अभिमानी दारिद्र्याला गगनाची दौलत मिळते...
पाऊस असा आला की.. मी लिहिले असते गाणे..
पण झाडासंगे भिजली सगळीच वहीची पाने...
विजय आव्हाड...
ReplyDeleteشركة نقل عفش بالقصيم