Wednesday, May 30, 2018

तू गेल्यापासून

शब्दही ना अस्फुटसा या मुखात आलेला
कर अजून वार ऊरी जीव नाही गेलेला

आठवणींना उराशी बांधून मी जगलेलो
अखेरीला साथ राहण्याचा वाद केलेला

ओढूनिया सहज तुटे हा नव्हे असा बंध
दाव तरी जोर किती तू उसना आणलेला

जाणूनिया जग सारे ठेवली ना जाण माझी
हे ही जाणले मी नाही मी किती अजाणलेला

तुकड्यांना हृदयाच्या दोष देती सर्व आता
तुटण्या आधीच का ना कोणी त्यास बोललेला

बरसत आहे अजून सर या नयनामधून
अन गेल्यापासून तू समुद्रही उधणालेला

-विशाल (१५/१२/२००७)

No comments:

Post a Comment