Tuesday, November 22, 2016

एखाद्या अन्नपूर्णेच्या हातातून भाजीत उतरणारी चव अगदी शेवटच्या थेंबापर्यंत चाखता यावी म्हणून बोटे चाटूनपुसून स्वच्छ करण्यातली गम्मत ... हात खराब होऊ नये म्हणून एका हातात चपातीचा तुकडा घेऊन दुसऱ्या हातातील चमच्याने त्यावर अलगद भाजी ठेवणाऱ्या आणि भातात वरण/आमटी/रस्सा टाकून तो हाताने कालवण्याऐवजी चमच्याने वरचेवर हलवून खाणाऱ्याला कधीच समजणारच नाही ...
(मेस मध्ये समोरच्या व्यक्तीला असे खाताना पाहिले कि हसावे कि हळहळावे तेच समजत नाही)

विशाल (२३. ११. २०१२, ठाणे)